Posts

साॅरी ‘आमिताभ’ जी..!

Image
  दुनियादारी    ‘हे घ्या पेढे! पाेरानं नांव काढलं बगा.... चांगलं अठठयाएेंशी टक्के मार्क  मिळऊन पाेरगं पास झालं!’ आमचा एक मित्र भल्या सकाळीच येऊन माझं ताेंड गाेड करीत हाेता... मधुमेहाचा आजार असला तरीही मी त्यातला अर्धा  पेढा टाकला ताेंडात... कुणाच्या आनंदात आपण कशाला विरझण घालायचं? आमचा हा मित्र आपल्या पुत्राचे गाेडवे गात हाेता..., वाटलं, चांगली गाेष्ट आहे, असेल ह्याचा मुलगा हुशार! आमच्या गप्पा चालल्यात तेवढ्यात अजून एक मित्र हजर! एका शाळेतला हा शिक्षक.. त्यानंही त्याच्या मुलाच्या काैतुकाचे पेढे दिले अन् त्याच्या आधी आलेल्या आमच्या या मित्राला समजाऊ लागला...‘नका नाराज हाेऊ.. पुढच्या वर्षी हाेईल पास तुमचा मुलगा..’ आमचा हा मित्र जाम उघडा पडला हाेता... पाेरगं नापास हाेऊनही दुनियेला दाखविण्यासाठी ही किती लबाडी! दुनियेला फसवताेय असं वाटून घेणारी ही मंडळी स्वत:च फसतात हाे..!      आमच्या एका धार्मिक चित्रपटाचं चित्रीकरण पंढरपुरात करायचं हाेतं. चित्रपट धार्मिक असल्यानं महिला कलाकार ही प्रेक्षकांच्या परिचयाची नसावी असा निर्मात्याचा आणि माझाही आ...

पराभवच ..., पण कुणाचा ?

Image
       दुनियादारी     रेल्वे स्टेशन जवळ आल्यामुळं तसा रेल्वेचा वेग बराच कमी झाली हाेता परंतु मध्येच करकच्चून ब्रेक दाबत रेल्वे एकदम थांबली. काय हाेतंय हे कळायच्या आधीच रेल्वेतील प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पडले तर वर ठेवलेले कुणाचे सामान कुणाच्या अंगावर पडले. दरम्यान रेल्वे इंजिनाच्या समाेर गर्दी जमू लागली हाेती. साधारण ४५ वर्षांचं वय असणारा एक उंचापुरा, धिप्पाड माणूस रेल्वेरूळावर आडवा पडलेला! त्याला आत्महत्या करायची हाेती. रेल्वे थांबली नसती तर एव्हाना सगळंच संपलेलं असतं!       ‘मरायला हीच जागा सापडली का?.. आधीच गाडी तासभर लेट झालीय!’ गर्दीतल्या एकानं त्याला खडसावलं ताेवर दुसरा म्हणाला, ‘आरं मंग लायटीच्या खांबावर चढायचं की!’...जाे ताे त्याला आत्महत्या करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत हाेता.., ताे मात्र शांत! एकटक नजर, निर्वीकार..! गाडीला आणखी उशीर हाेताेय याची प्रवाशांना चिंता.. गर्दी बाजूला सारत मी पुढं गेलाे, त्याच्या डाेक्यावरून मायेचा हात फि रवला आणि त्याचा हात धरून त्याला बाजूला घेतलं... माझ्या...

--- कव्वे काे ‘बाप’ बनायें..!

Image
 गेल्या काही दिवसांपासून पक्ष पंधरवड्याच्या निमित्तानं  दिवंगत आई बापाला जाम मेजवानी चालू आहे. पक्ष पंधरवडा आला की हे सगळं आलंच! परंपरा, रिवाज वगैरे सगळं ठिक आहे हाे, पण यातील किती जणांनी आई बाप हयात असताना त्यांना जपलंय ते पहा एकदा! मेल्यावर त्यांच्या नावानं कावळ्यांना खाऊ घालण्यापेक्षा जिवंतपणी आई बापाला घाला ना..! त्यांना कधी चटणी भाकरी दिली नाही अन् कावळ्यांना लाडू, पुरणपाेळी! या म्हाताऱ्यांना खाण्यापिण्यापेक्षा अन् पैशापेक्षा हवं असतं तुमचं प्रेम.. अन् ते मिळतच नाही. श्राध्दाला मात्र सगळं काही! कावळ्यांना देता तेवढं जरी आधीच आई बापाला दिलं असतं तर? संत तुकाेबा म्हणतात,                     ‘भुके नाही अन्न,                     मेल्यावरी पिंडदान...                    हे ताे चाळवाचाळवी,                    केली आपणाची ठेवी’  माणूस गेल्यावरच त्...

हरवलेत ‘गुरूजी’ अन् बेपत्ता ‘विद्यार्थी ’...!

Image
     ‘सर, हे घ्या पेढे!’ कालच संध्याकाळी एक गुरूजी, (अर्थात आजच्या भाषेतले शिक्षक)  घरी आले अन् माेठ्या आनंदानं पेढे द्यायला लागले. आता पेढे म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी! मी आपलं विचारलं, काय हाे गुरूजी, ‘मुलगा झाला काय?’ गुरूजी छाती फुगवत म्हणाले, ‘नाही हाे... मला ‘शिक्षक दिनाचा’ पुरस्कार मिळालाय... त्याचे हे पेढे!’ त्यांचं अभिनंदन तर करायलाच हवं हाेतं.. मी ते केलंही पण त्यांच्या जवळ जाताच  भपकन् वास आला... दारूचा हाे! गुरूजींना विचारलं, ‘अहाे, हे काय?’ गुरूजी हसत म्हणाले, ‘काही नाही हाे.. आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांनी पार्टी  मागितली... ‘घेतली’ आपली थाेडीशी!’ कसलाही अपराधी भाव नव्हता या ‘गुरूजी’ च्या चेहऱ्यावर !        मला माझ्या लहानपणीचे गुरूजी आठवले. धाेतर नाहीतर पायजमा... चेहऱ्यावर सतत सात्विक भाव! अख्खा गावगाडा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणं  चालायचा! गावातले सगळे महत्वाचे निर्णय  हे ‘गुरूजी’ घेत अन् सारं गाव त्याला मान्यता द्यायचं. आता धाेतर गेलं, पायजमा गेला... जीन पॅट, शर्टचा ...

श्रीमंत मनाचा भिकारी

Image
    माणूस गरीब असला की त्याला नाती गोती काही नसतात! मित्रमंडळी, पाहुणे रावळे या सगळ्यापासून तो खूप दूर असतो! माणूस जन्माला आला की जन्मासोबत नातीही जन्माला येत असतात पण त्याचा खिसा रिकामा झाला की जवळच्या माणसांची मनंही रिकामी होतात.  कुणी मोठा माणूस असला की बळजबरीनं त्याच्याशी नातं सांगतात, कुणी म्हणतं "हे माझे वर्गमित्र"  कुणी म्हणतं  आम्ही बालमित्र ! कसलाच काही संबंध नसतो पण बळजबरीचं नातं जोडतात आणि आपले आईवडील अडगळीला टाकतात. चुकून कुणा तथाकथित मोठ्या माणसासोबत असताना फ़ाटका बाप जवळ आला तर त्याला ओळख द्यायला तयार होत नाहीत त्यांनीच वाढवलेली मुलं ! घरातला कुणी नौकर आहे असं सांगायलाही मागे पुढे पाहत नाहीत. फाटक्या कपड्यातला आणि तुटक्या चपलेतल्या बापाला 'बाप' म्हणायची लाज वाटते हो ! मुलाला लहानाचं मोठं करता करता त्याच्या अंगावरच्या कपड्याने ठिगळ लावायलाही त्याला उसंत मिळालेली नसते आणि याच्यावर एवढे पैसे खरंच केलेले असतात की, तुटलेली चप्पल शिवायलाही त्याच्या फाटक्या खिशात दहा वीस रुपये उरलेले नसतात. पण त्याला काय? खोट्या दुनियेत वावरताना त्याला ...

हर चेहरे पे नकाब है..

Image
                                                      हर चेहरे पे नकाब हैं ........       अभिनेता सुशांतसिंग राजपूत गेला...., श्रद्धांजली! आत्महत्या केली त्यानं. सगळीकडं दुःख व्यक्त झालं आणि होतंय. समाज माध्यमं व्याकुळ झाली. अनेकांना तर आपल्या घरातील कुणी गेल्याचं दुःख झालं. होणारच! कुठल्याही संवेदनशील मनाला अशा वेळी यातना होणार हे स्वाभाविक आहेच. तसं पाहिलं तर कुणाचाही प्राण जाणं ही वेदनादायी बाब आहे पण रोज शेतकरी आत्महत्या करतो तेंव्हा किती जण कळवळतात? हा सवालही समाजमाध्यमांवर उपस्थित झाला आहे. कुणीही आत्महत्या करतो ते आनंदानं नक्कीच नाही. आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा, पळून जाणे वगैरे वगैरे बरंच काही बोललं जातं...पण हे बोलण्यापुरतं आणि पुस्तकातल्या पानात छापण्यापुरतंच असतं. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच ते कळतं. मी तर म्हणेन, आत्महत्या हे भेकडाचं नव्हे तर धाडसाचं काम आहे. पायाखाली किडा मुंगी आली तरी आपण कळवळतो तिथं चक्क स्वत...